Friday, 5 December 2025

चला परंपरा समजावून घेऊ

विरोधकांकडे दुर्लक्ष करुन चला परंपरा समजावून घेऊ#

सनातन वैदिक संस्कृतीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मौखिक परंपरा.ज्यावेळी सारे काही मनात साठवून आयुष्यभरासाठी सांभाळायचे तो हा काळ.वेदांनाही श्रुती म्हटले जाते कारण कानांनी ते ऐकणे आणि मुखाने कंठस्थ करणे.
हे सारे पाठांतर करण्यासाठीच निरनिराळ्या पद्धती विकसित झाल्या ज्याला जटा,क्रम,घनपाठ म्हटले जाते.शद्धता सांभाळणे आणि पाठांतर नीट होणे यासाठी या रचना!
यामधेही गुरू आणि शिष्य यांचे एक नाते असते.गुरू विद्यार्थ्याच्या क्षमता पाहून त्यानुसारच त्याला ज्ञान देत असे.त्याचे टप्पे ठरवत असे.
उपनयनानंतर गुरूगृही केलेला शिष्य समावर्तन संस्कारानंतर म्हणजे सोडमुंज होउनच घरी परत येई.
हे सारे काही विशिष्ट समाजगटापुरते मर्यादित होते याचे कारणसमाजव्यवस्थेमधे प्रत्येकाला आपापल्या क्षमतेनुसार,स्वभावानुसार कामांची विभागणी करून दिलेली होती.कुणी कमी कुणी जास्त ही गडबड पुरूषसूक्तातील एका मंत्राने झाली हे दुर्दैव.ज्यांनी तो अर्थ मोठ्या प्रमाणात प्रचलित केला त्यांनी ते सहेतुक केले असण्याची शक्यता दाट!
खरंतर सारे त्या विराटपुरूषाचेच घटक.कुणी मुखातून,कुणी पायातून,कुणी उदरातून,कुणी खांद्यातून.पण हे सारे एकाच शरीराचे अवयव नं हे मात्र पुढे येऊ न देता तिथे मात्र मुख श्रेष्ठ आणि पाय कमी दर्जाचे हे ज्याने प्रसृत केले तो धन्यच!आणि तेच जोखड घेऊन आपण शतकानुशतके मार्गक्रमणा करीत आहोत.
कंठस्थीकरण म्हणजेच पाठांतरवरच जे ज्ञान आधारित आहे ते त्याच पद्धतीने शिकले जाणार आहे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.Miss World, Miss Universe सारखे देशाची आर्थिके गणिते व हितसंबंध सांभाळत लागणारे हे निकाल नसतात.
ज्या काळात अगदी म्हणाल की भेदाभेद झाला म्हणून काही गट ज्ञानापासून वंचित राहिला.पण मग आता तर शिक्षणाची द्वारे मुक्त आहेत.ब्राह्मण कुटुंबातील मुलगा सैन्यात जातो,क्षत्रिय कुटुंबातील मुलगा शास्रज्ञ होतो,वैश्य व्यापार सोडून कला जगतो...तसं मग आता यावं नं पुढे त्यांनी जे टीका करत आहेत त्यांनी...आणि करुन पहावं कंठस्थीकरण.
वेदांना अपौरूषेयत्व दिलं ते याचसाठी.एक शब्द चुकला तरी अर्थाचा अनर्थ होणारी उदाहरणं यात दिली गेली ती या रचनांचे पावित्र्य सांभाळण्यासाठी.
मला कलेची आवड आहे आणि मला कुणी तू गणितच शीक आणि जगाला शिकव असं सांगितलं तर चालेल का?
बारा बलुतेदारांची कला ही वंशपरंपरागत पद्धतीने चालत आली आहे.त्यात कुणी हस्तक्षेप केला तर ते आहे त्याच सुंदर पद्धतीने समोर येईल का?
चौसष्ट कलांमधे धातुकाम,स्थापत्य,सुतारकाम यांचा समावेश होतो हे किती जणांना माहिती आहे?
आपल्या क्षमतेनुसार,धारणेनुसार आपण काही ना काही शिकावे आणि चरितार्थ चालवावा.घोकून जे शिकलो आहोत ते पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम म्हणजे संस्कृतीचा वारसा पुढे हस्तांतरित करणे.
आता दुर्दैवाने गुरुकुल पद्धती जवळजवळ नामशेष झाली परंतु ब्राह्मणाचे कर्तव्य अध्ययन अध्यापन यजन याजन हे होते व त्यातून त्याचा चरितार्थ चाले.क्षत्रिय प्रजेचा सांभाळ करी.सारा वसूल करुन त्यातून प्रजापालन होई.वैश्य व्यापार करुन समाजाच्या गरजा पुरवीत असे.याखेरीज समाजासाठी आवश्यक आणि समाजाला मदत करणारी जी कामे होती ती करण्यासाठीही एक गट होता पण म्हणून त्यांना कमी लेखण्यात पटाईत आहेत टोपीकर! त्यांच्या कमरेला झाडू बांधून त्यांना रस्त्याने फिरण्याची सक्ती झाली हे खरे! पण आता काळ बदलला नं! त्याचं काय?
 छत्रपतींच्या स्वराज्यातील शिलेदारांची नामावली पाहिली तर तिथेही वाचून पहा आडनावांसकट! शिवरायांनीही क्षमतेनुसार कामे वाटून दिली आहेत.गडावरच्या कचेरीत कुणी काम करावे आणि हाती शस्र घेऊन कुणी धावावे? इतिहास मुळातून नुसता वाचून उपयोग नाही,तो समजून घ्यायला हवा! स्वराज्यात सार्‍यांना मान होताच.
जो राजा असतो त्याला कुणी निंदणार,कुणी वंदणार हे ठरलेले! पण विधायक बदलांना सकारात्मक प्रतिसाद द्यायला काय हरकत आहे आजच्या काळातही? त्यात कशाला आणखी राजकारण करायचं?
शेवटी क्षमता,वकुब,आवड आणि ज्याला Aptitude म्हणतात असाही काही भाग निश्चितच आहे.
एक ब्राह्मण मुलगा श्लोक पाठांतर करुन जगभरात पुढे जातो आहे याचा आदर्श त्याच्या आडनावापलीकडे जाऊन घेण्याचा विचार कुणाच्या मनात आला आहे का?
यांच्या आरक्षणापायी आमची मुलं क्षमता असूनही जात्यात भरडली जात आहेत...
काही वेळा अनुल्लेखाने मारणे हेच अशांच्या बाबतीत करायला लागेल.त्यांच्या वाढत्या संख्येला थोपविणे आपल्याला शक्य नाही कारण आपण आपल्या संस्कृतीला विसरत चाललो आहोत.ते त्यांची संस्कृती जी काही आहे,जशी आहे ती जगतात हे आपणही लक्षात घ्यायला हवंय!त्यातूनच त्यांचे अभिनिवेश जन्म घेतात!!
मूळ मुद्दा जे पठणातूनच साध्य करायचे आहे ते संगणकाला अनुकूल आहे की अन्य कुणाला? यापेक्षा खुल्या मनाने मानवी क्षमतेचे व प्रयत्नांचे  कौतुक करा व जे घडले त्याकडे सकारात्मक रीतीने पाहून अनुसरण्याचा प्रयत्न करा.
©आर्या

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...