ताम्हाण्याच्या पोतडीतून#
श्रीमन् नारायण नारायण हरि हरि।
तिन्ही सांजेची वेळ,नृसिंहाचा जन्म,कीर्तनकार बुवांच्या अभिव्यक्तीतून प्रत्यक्ष प्रकटलेला नृसिंहच जणू,फुलांची उधळण,कडकडला स्तंभ गडगडले गगनची आर्त साद,.... क्या गुजरी है शाम!
राजापूर जवळच्या केळवली गावातल्या नृसिंह मंदिरात आज आलो.जोश्यांचं कुलदैवत आहे हे.त्यामुळे स्वाभाविकच प्रभुदेसाई आप्तमंडळींसह आलो.बुवांचं ताल सूर लय युक्त कीर्तन,शंकरा रागातलं पूर्वरंगाचं भजन लांबपर्यंत ऐकू येत होतं.समस्त सप्रे कुटुंबांच्या गृहलक्ष्मी आणि कन्या नऊवार ते पाचवार पैठणी,मोत्याचे वेल,नथ अशा सजल्या होत्या. त्यांच्या केसात माळलेल्या अबोली आणि मोगर्याचा दरवळ पसरला होता.गाभार्यात उग्ररूप धारण केलेली लक्ष्मीसहित नृसिंहमूर्ती तुळशीच्या हाराने सजली होती.नृसिंहाच्या चरणी मोद करीत कमळ वहा अशी खुमासदार टिपण्णी करीत कीर्तन सुरु होतं.फार कमी वेळा अशी संवादिनी,तबला आणि गायकाची जाणयुक्त जुगलबंदी कीर्तनात अनुभवायला मिळते.ती पर्वणी आज लाभली.वसंतपूजेने ब्रह्मवृंदाचं आदरातिथ्य झालं.कोकणातला उत्सव म्हणजे ढोल ताशा हवाच.तीही धून रंगली.रात्रीच्या पालखीने तर शरीर मन डोलू लागलं.माझ्यासारख्या उत्सवप्रिय व्यक्तीला जगायला असे संदर्भ पुरेसे असतात.लळीताच्या कीर्तनाला पहाटे येऊ या रे! अशी माझी मागणी आमचे नवोदित शेतकरी पुरवतात का ते पाहते आता!!
पण खरच! काय हवं असतं आणखी आयुष्यात! उत्सवात भक्तिरसाने भरलेल्या वातावरणात,हिरव्या निसर्गात स्वतःला विसर्जित करणं यापेक्षा अपार सुख काही असेल का???? आर्या.
श्रीमन् नारायण नारायण हरि हरि।
तिन्ही सांजेची वेळ,नृसिंहाचा जन्म,कीर्तनकार बुवांच्या अभिव्यक्तीतून प्रत्यक्ष प्रकटलेला नृसिंहच जणू,फुलांची उधळण,कडकडला स्तंभ गडगडले गगनची आर्त साद,.... क्या गुजरी है शाम!
राजापूर जवळच्या केळवली गावातल्या नृसिंह मंदिरात आज आलो.जोश्यांचं कुलदैवत आहे हे.त्यामुळे स्वाभाविकच प्रभुदेसाई आप्तमंडळींसह आलो.बुवांचं ताल सूर लय युक्त कीर्तन,शंकरा रागातलं पूर्वरंगाचं भजन लांबपर्यंत ऐकू येत होतं.समस्त सप्रे कुटुंबांच्या गृहलक्ष्मी आणि कन्या नऊवार ते पाचवार पैठणी,मोत्याचे वेल,नथ अशा सजल्या होत्या. त्यांच्या केसात माळलेल्या अबोली आणि मोगर्याचा दरवळ पसरला होता.गाभार्यात उग्ररूप धारण केलेली लक्ष्मीसहित नृसिंहमूर्ती तुळशीच्या हाराने सजली होती.नृसिंहाच्या चरणी मोद करीत कमळ वहा अशी खुमासदार टिपण्णी करीत कीर्तन सुरु होतं.फार कमी वेळा अशी संवादिनी,तबला आणि गायकाची जाणयुक्त जुगलबंदी कीर्तनात अनुभवायला मिळते.ती पर्वणी आज लाभली.वसंतपूजेने ब्रह्मवृंदाचं आदरातिथ्य झालं.कोकणातला उत्सव म्हणजे ढोल ताशा हवाच.तीही धून रंगली.रात्रीच्या पालखीने तर शरीर मन डोलू लागलं.माझ्यासारख्या उत्सवप्रिय व्यक्तीला जगायला असे संदर्भ पुरेसे असतात.लळीताच्या कीर्तनाला पहाटे येऊ या रे! अशी माझी मागणी आमचे नवोदित शेतकरी पुरवतात का ते पाहते आता!!
पण खरच! काय हवं असतं आणखी आयुष्यात! उत्सवात भक्तिरसाने भरलेल्या वातावरणात,हिरव्या निसर्गात स्वतःला विसर्जित करणं यापेक्षा अपार सुख काही असेल का???? आर्या.
No comments:
Post a Comment