पुरुषोत्तमाच्या नावाने प्रसिद्ध पावलेला महिना.जावई मंडळींचा खास आग्रहाचा. मधे एक विनोद आला होता की घरात तोफखाना सांमाळण्याची किंमत जावयाला दर तीन वर्षांनी एकदा मिळते म्हणे! विनोदाचा भाग सोडला तर बाहेरून आलेली मुलगी तोफखाना आणि यांच्या घरातल्या महिला काय थंडगार वाहणार्या नद्या!!!
मुळातच चांद्र आणि सौर कालगणनेमध्ये तेहतीस दिवसांचं पडलेलं अंतर भरून काढणारी ही शास्रीय योजना आहे.त्याचा आणि जावयाच्या वाणाचा काय संबंध?
आपले धर्मशास्रकार विचारी होते.पूर्वी लहान वयात मुलींची लग्न होत असत. अशावेळी त्यांच्या घरातल्या मंडळींनी विशेषतः मोठ्या वयाच्या नवर्याने त्यांना समजून घ्यावे यासाठी ही एक विनंतीच असावी.जिला नंतर वाणाचे महत्व दिले गेले.
सच्छिद्र म्हणजे फुटक्या कानाचे असू नका.कानगोष्टींवर विश्वास न ठेवता जे समोर अनुभवाला येते ते पहा असाही संदेश असावा.पूर्वी ज्या गोष्टी उदा.अनारश्याचे पीठ तयार मिळत नसे.त्यामुळे घरी असे पदार्थ होणे आणि ते दानात देणे ही अपूर्वाई वाटत असावी.
अलीकडे जागतिक बाजारपेठेच्या सुबत्तेत आणि चकचकाटी दुनियेत अर्थाला भरपूरच मान आहे.विकत घेणारे आहेत म्हणून विकणारेही असणारच नं.
पण याचा सारासार विचार आधुनिक शिक्षित पिढीने करायला हवा.जावयांनीच म्हणायला हवं की हे मला देण्याऐवजी गरजूला द्या.मला तुमचे आशीर्वादच पुरेसे आहेत.
दानाचे,तीर्थयात्रांचे महत्व सांगताना या काळात केलेले वाढते ,अधिक फळ मिळते. मग अभ्यास करा तोही वाढेल.चांगला उपक्रम करा त्याचंही पुण्य मिळेल.
या "अधिकाकडे" जितक्या " अधिक" सकारात्मकतेने पाहू तितकं फल नक्कीच " अधिक" मिळेल.
आर्या.
No comments:
Post a Comment