लाॅकडाऊनच्या काळात ताम्हाण्याच्या बाहेरही पडता येत नव्हतं त्यामुळे इतर वेळी भटकायला जातो तसं यावेळी शक्य नव्हतं.कधी पन्नास किलोमीटरवरचा समुद्र,कधी एखादं मंदिर कधी कुणा परिचितांच्या घरी एवढंच काय राजापुरातल्या ठाकुर बेकरीतले माझ्या प्रचंड आवडीचे पदार्थही आता मिळू शकणार नव्हते.
पुण्यात मनात आलं की आज किंवा उद्या हा पदार्थ करुन खाऊ की जाता येता दुकानातूनसगळी सामग्री उचलता येते. ताम्हाण्यात हे मिळत नसलं म्हणजे चीज,पनीर,ब्रेड ;तरी पाचल या आठवडी बाजाराच्या गावी ते मिळतं.मग बुधवारी बाजाराच्या दिवशी आणलेल्या वस्तू रविवारपर्यंत वापरायच्या कारण या घरी ठरवून फ्रीज घेतलेला नाही.
सर्वात मोठा प्रश्न आला इंटरनेटचा. पुण्यातही मिळत नाही इतकं वेगाने इंटरनेट एरवी इथे मिळतं. पण मुंबईकर इथे अडकल्याने आणि टाॅवरचा वेग तेवढाच राहिल्याने वापर आणि पुरवठा याचं समीकरण जुळत नाही.
विकीस्र्रोताच्या अभियानात नेहमीच्या उत्साहाने भाग घेतला पण नेट नसल्याने मला जेमतेम दोन दिवस अगदीच थोडं काम करता आलं.पुण्याला आठ दिवसांनी परत जायचं असल्याने मी माझा लॅपटाॅपही आणलेला नाही.त्यामुळे माझी प्रबोधिनीची कामंही ठप्प.
मोबाईलवर बोटांनी आणि मिचमीच डोळ्यांनी किती लिहायचं असा प्रश्न मला पडायला लागला.
एकूणातच सगळ्या आघाड्यांवर काहीतरी मोठ्ठं missing होतं! हे मी आत्ता लिहिते आहे पण पोस्ट कधी होईल तेही सांगू शकत नाही कारण इंटरनेटची कृपा व्हायला हवी!
खूप चिडचिड झाली सुरुवातीला! पण एक दिवस शांतपणे विचार केला की सगळे धावत आहेत म्हणून मी पण तो अट्टहास करावा का? अनुकूलता असते तेव्हा मी ते करतेच ना! पण मग हा काळ "स्वल्पविराम" म्हणून स्वतःसाठी घोषित करुन टाकूया! परिस्थिती स्विकारली की मग त्रास कमी होईल मनाला!
भाज्या नाहीत तर उसळी करू, शेतात भरपूर वांगी आली एकदम तर एकदिवसाआड वांग्याचेच पदार्थ करून पाहू वेगवेगळे!
शेतातली कामंही लाॅकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात माणसांच्या उपलब्धतेमुळे धिम्या गतीने सुरू होती त्यामुळे मी पण निवांत दिवशी निवांत स्वयंपाक करायचे. गरमगरम वाढायचे करून पानात!
नंतर माणसं यायला लागली आणि घर व शेत गजबजून गेलं. मदतनीस दादाची दोन लेकरं खेळायला येतं तेव्हा तर घर अंगण परस म्हणजे नुसता धुमाकूळ. ही माणसं,मुलं यांना "वाचणं" हे मी या काळात केलं!
सकाळचा चहा पक्षी पहात पहात, नेट मिळालं तर त्यातलं काही स्टेटसला ठेवणे, या घरात असलेली पुस्तके वाचणे,काही नाहीतर नुसतं बसून राहणे जे मला इतक्या वर्षात कधी जमलं नाही ते यावेळी केलं!
मातीच्या ओव्हनमधे केक,बिस्कीटे करून पाहणे, मधुबनी चित्र काढायला शिकणे, पुस्टक वाच तर रोज होतंच पण इथे जरा हलकं फुलकं साहित्य वाचलं गावात ग्रंथालयात जे मिळतं ते!तरी गो.नीं.दां, रविंद्रनाथ वगैरे छान छान मिळत गेलं इथेही!
इंटरनेट मिळालं की फेबुला काही लिहिणं, मधुबनीची सरावचित्र डाऊनलोड करणं ,रेसिपी पाहून ठेवणं वगैरे उद्योग मी केले. मेल पाहणे,उत्तरे नोंदवणे आणि नेट आलं की पाठवून देणे हेही करत होते.
पण तेव्हा जाणवलं की आपण सवयीचे गुलाम झालो आहोत. अमुक तमुक नाही तर लगेच अडतं आपलं.पण या स्वल्पविरामाने मला हा निवांतपणा शिकवला.
लोक ढगात झूम मिटींग करत असताना मी नेटच्या अभावी जरासा "झूम" लू मै म्हणत वाडीत फिरत फोटो काढले. मी फिकीरच नाही केली की माझ्यामुळे काही अडतय! आपला भ्रम असतो की हे मी केलं पाहिजे आणि हे मी केलं तरच मला किती आत्मीयता आहे, गांभीर्य आहे आणि सध्या सगळं बंद असताना माझं मात्र "सगळं"सुरू आहे...वगैरे इतरांना कळेल...(हे माझं माझ्यापुरतं realization आहे) मी यातून कधीच बाहेर पडले. मला स्वल्पविराम हवा होता तो मला इंटरनेट अभावाने बहाल केला.
माणसंही कळली बरं का! माझं स्टेटस दिसलं नाही सलग दोन दिवस की कासावीस मैत्रीणींनी फोन केले की बरी आहेस ना वगैरे! मग कळलं की आपल्या फोनच्या संपर्कात नोंदवलेले किती लोक आपल्या खरोखर "संपर्कात"असतात!!!!
काही जणांनी आवर्जून आवड लक्षात घेऊन काही ना काही पाठवलं की हे पहा.. याचा आनंद घे... ही माणसंही जरा जवळची वाटली पुन्हा!
पण कधीही काहीही न नोंदवणारी माणसं आपली नसतात ती फक्त तेवढ्यापुरती गोड असतात कारण त्यांचा त्यात स्वार्थ असतो हेही कळलं.
कुणासाठी जीव तुटू द्यायचा आणि कुणासाठी नाही हे ही या विरामाने शिकवलं.
याला " पूर्णविराम" नाही.कारण नव्या साक्षात्काराची सुरुवात आहे ही ... अजून खूप गाठायचय!!!!
पुण्यात मनात आलं की आज किंवा उद्या हा पदार्थ करुन खाऊ की जाता येता दुकानातूनसगळी सामग्री उचलता येते. ताम्हाण्यात हे मिळत नसलं म्हणजे चीज,पनीर,ब्रेड ;तरी पाचल या आठवडी बाजाराच्या गावी ते मिळतं.मग बुधवारी बाजाराच्या दिवशी आणलेल्या वस्तू रविवारपर्यंत वापरायच्या कारण या घरी ठरवून फ्रीज घेतलेला नाही.
सर्वात मोठा प्रश्न आला इंटरनेटचा. पुण्यातही मिळत नाही इतकं वेगाने इंटरनेट एरवी इथे मिळतं. पण मुंबईकर इथे अडकल्याने आणि टाॅवरचा वेग तेवढाच राहिल्याने वापर आणि पुरवठा याचं समीकरण जुळत नाही.
विकीस्र्रोताच्या अभियानात नेहमीच्या उत्साहाने भाग घेतला पण नेट नसल्याने मला जेमतेम दोन दिवस अगदीच थोडं काम करता आलं.पुण्याला आठ दिवसांनी परत जायचं असल्याने मी माझा लॅपटाॅपही आणलेला नाही.त्यामुळे माझी प्रबोधिनीची कामंही ठप्प.
मोबाईलवर बोटांनी आणि मिचमीच डोळ्यांनी किती लिहायचं असा प्रश्न मला पडायला लागला.
एकूणातच सगळ्या आघाड्यांवर काहीतरी मोठ्ठं missing होतं! हे मी आत्ता लिहिते आहे पण पोस्ट कधी होईल तेही सांगू शकत नाही कारण इंटरनेटची कृपा व्हायला हवी!
खूप चिडचिड झाली सुरुवातीला! पण एक दिवस शांतपणे विचार केला की सगळे धावत आहेत म्हणून मी पण तो अट्टहास करावा का? अनुकूलता असते तेव्हा मी ते करतेच ना! पण मग हा काळ "स्वल्पविराम" म्हणून स्वतःसाठी घोषित करुन टाकूया! परिस्थिती स्विकारली की मग त्रास कमी होईल मनाला!
भाज्या नाहीत तर उसळी करू, शेतात भरपूर वांगी आली एकदम तर एकदिवसाआड वांग्याचेच पदार्थ करून पाहू वेगवेगळे!
शेतातली कामंही लाॅकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात माणसांच्या उपलब्धतेमुळे धिम्या गतीने सुरू होती त्यामुळे मी पण निवांत दिवशी निवांत स्वयंपाक करायचे. गरमगरम वाढायचे करून पानात!
नंतर माणसं यायला लागली आणि घर व शेत गजबजून गेलं. मदतनीस दादाची दोन लेकरं खेळायला येतं तेव्हा तर घर अंगण परस म्हणजे नुसता धुमाकूळ. ही माणसं,मुलं यांना "वाचणं" हे मी या काळात केलं!
सकाळचा चहा पक्षी पहात पहात, नेट मिळालं तर त्यातलं काही स्टेटसला ठेवणे, या घरात असलेली पुस्तके वाचणे,काही नाहीतर नुसतं बसून राहणे जे मला इतक्या वर्षात कधी जमलं नाही ते यावेळी केलं!
मातीच्या ओव्हनमधे केक,बिस्कीटे करून पाहणे, मधुबनी चित्र काढायला शिकणे, पुस्टक वाच तर रोज होतंच पण इथे जरा हलकं फुलकं साहित्य वाचलं गावात ग्रंथालयात जे मिळतं ते!तरी गो.नीं.दां, रविंद्रनाथ वगैरे छान छान मिळत गेलं इथेही!
इंटरनेट मिळालं की फेबुला काही लिहिणं, मधुबनीची सरावचित्र डाऊनलोड करणं ,रेसिपी पाहून ठेवणं वगैरे उद्योग मी केले. मेल पाहणे,उत्तरे नोंदवणे आणि नेट आलं की पाठवून देणे हेही करत होते.
पण तेव्हा जाणवलं की आपण सवयीचे गुलाम झालो आहोत. अमुक तमुक नाही तर लगेच अडतं आपलं.पण या स्वल्पविरामाने मला हा निवांतपणा शिकवला.
लोक ढगात झूम मिटींग करत असताना मी नेटच्या अभावी जरासा "झूम" लू मै म्हणत वाडीत फिरत फोटो काढले. मी फिकीरच नाही केली की माझ्यामुळे काही अडतय! आपला भ्रम असतो की हे मी केलं पाहिजे आणि हे मी केलं तरच मला किती आत्मीयता आहे, गांभीर्य आहे आणि सध्या सगळं बंद असताना माझं मात्र "सगळं"सुरू आहे...वगैरे इतरांना कळेल...(हे माझं माझ्यापुरतं realization आहे) मी यातून कधीच बाहेर पडले. मला स्वल्पविराम हवा होता तो मला इंटरनेट अभावाने बहाल केला.
माणसंही कळली बरं का! माझं स्टेटस दिसलं नाही सलग दोन दिवस की कासावीस मैत्रीणींनी फोन केले की बरी आहेस ना वगैरे! मग कळलं की आपल्या फोनच्या संपर्कात नोंदवलेले किती लोक आपल्या खरोखर "संपर्कात"असतात!!!!
काही जणांनी आवर्जून आवड लक्षात घेऊन काही ना काही पाठवलं की हे पहा.. याचा आनंद घे... ही माणसंही जरा जवळची वाटली पुन्हा!
पण कधीही काहीही न नोंदवणारी माणसं आपली नसतात ती फक्त तेवढ्यापुरती गोड असतात कारण त्यांचा त्यात स्वार्थ असतो हेही कळलं.
कुणासाठी जीव तुटू द्यायचा आणि कुणासाठी नाही हे ही या विरामाने शिकवलं.
याला " पूर्णविराम" नाही.कारण नव्या साक्षात्काराची सुरुवात आहे ही ... अजून खूप गाठायचय!!!!
No comments:
Post a Comment