Wednesday, 28 March 2018

माझी कविता

कधी कधी भेटतात माणसं आयुष्यात, स्वतःच्याच बेहोशीत जगणारी!
त्यांना नसते तमा दुसर्‍याच्या मनाची.... असं समजतो आपण!
पण चुकुन कधीतरी अनुभवाला येतो अशांच्या मनाचा हळवा कोपरा...
थक्क होतो आपण आपल्याच नकळत अनुभवून असं काही!
मनातलं नकळत दिसतं जेव्हा डोळ्यात,खोल गहिर्‍या डोहात..
त्या डोहातल्या काळ्याकुट्ट भासणार्‍या जळात हळूच टपकतं एक फूल...फांदीवरुन
आणि होऊन जातो तो गंभीर डोह तरल,गंधीत आणि सांगून जातो मनीचं कूज!
कदाचित कृष्णाच्या पाव्याचाही असाच असेल का गहिरा रंग??? जो छेडत असेल सुमधूर तान गंधीत स्पर्शाने नटलेली??

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...